मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृह विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत नाशिकमधील कथित धर्मांतर प्रकरण, परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरण, खरात प्रकरण तसेच मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरण यांचा सविस्तर आढावा घेतला.
या सर्व प्रकरणांमध्ये तपास अधिक काटेकोर, पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले. तसेच समाजात धर्मांतरासारख्या घटनांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि अशा प्रकारांना कठोरपणे हाताळले जाईल, असेही त्यांनी बैठकीत ठामपणे सांगितल्याचे समजते.
या बैठकीस राज्याचे पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.