प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना घ्यावा लागतो खाजगी ऑटोचा आधार.P.H.C. ची 108 ऋणवाहिका पडली धुळखात.
हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी.
परभणी: जिंतूर तालुक्यातील इंदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिका गेल्या अनेक महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत गूळ खात पडली असून वेळेवर रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळे ऐनवेळी प्रस्तुतीसाठी आलेल्या रुग्णाना दवाखान्यात जाण्यासाठी आपला जीव मोठे धरण खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे अशा ह्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ व भोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
अधिक माहिती अशी की सावळी गावातील एक गर्भवती महिलेला अचानकप्रसुती कळा सुरू झाल्याने सुरू झाल्याने आशा वर्कर कार्यकर्तेंशी संपर्क साधला व आशावर्कर कार्यकर्त्यांना तातडीने 108. मात्र” सध्या वाहन उपलब्ध नाही ” असे धक्कादायक असमजस्यपणाचे उत्तर कंट्रोल रूम मधून देण्यात आले दरम्यानप्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात 108 उभी असतानाही ती सेवेत नसल्याचे गंभीर बाब समोर आली आहे मग नाईलाजास्तव सोबतच्या नातेवाईकांना खाजगी ऑटो चा सहारा घेऊन व आवाज तवा भाडे देऊन त्या महिलेला येलदरी आरोग्य केंद्रात दाखल करावे लागले सुदैवाने माता व बाळ सुखरूप असले तरी ऐनवेळी रुग्णवाहिका न मिळाल्याने मोठा अनर्थ घडू शकला असता अशी भीती परिसरातील नागरिक आणि व्यक्त केली स्थानिकांच्या माहितीनुसार येलदरी PHC ची 108. हे रुग्णवाहिका किरकोळ बिघाडामुळे अनेक दिवसापासून एका जागेवर उभी आहे वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार निवेदन सादर करूनही व दूरध्वनीद्वारे कळूनही कळवूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे शासनाने करोडो रुपये खर्च करून मोफत रुग्णसेवा सुरू केली आहे पण स्थानिक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे रुग्णवाहिका धूळ खात पडली आहे आणि रुग्णाचे हाल बेहाल होत आहेत गरीब कामगार रुग्णांना ऐनवेळी खाजगी वाहनांचा सहारा घेऊन मागेल तेवढी रक्कम देऊन रुग्णाला कसेबसे दवाखान्यापर्यंत पोहोचले जात आहे सावळी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. येलदरी परिसरातील नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी यांच्याकडे तातडीने मागणी केली आहे की नादुरुस्त 108 रुग्णवाहिका त्वरित दुरुस्त करून रुग्णसेवेसाठी 24 तास उपलब्ध करून द्यावी व तसेच वाहन उपलब्ध नाही नाही असे बेजवाबदारपणाचे उत्तर देणाऱ्याव गर्भवती महिलेच्या जीवनाशी खेळ खपून घेतला जाणार नाही आरोग्य विभागाने हा खेळ तात्काळ बंद करावा व याची दखल घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरूदोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समस्त ग्रामस्थांनी दिला आहे.